सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारत पाकिस्तानमध्ये पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकेल का
Apr 30, 2025 · 6 min
भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर