भारत आणि चीन कधी मित्र होऊ शकतात का? BBC News Marathi
२०२३ अक्टोबर २८ · १७ मिनेट
ऑगस्ट 2023 मध्ये भारत आणि चीनमधला तणाव पुन्हा वाढला. एकमेकांवरच्या विश्वासाला तडे गेले आणि सीमेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दोन्ही देशांनी एकमेकांना संयमानं वागण्याचा सल्ला दिला. झालं काहीच नाही, पण दोन्ही देशांमधली मतभेदांची दरी आणखी वाढली. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दोन देशांत अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे. पण तणावामागे केवळ हे एकच कारण नाही. मग हे दोन्ही देश आपल्यातलं नातं सुधारू शकतात का, सारं काही आलबेल बनू शकतं का? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया